देश-विदेशभारत

उत्तराखंडमधील गौरीकुंडमध्ये भीषण हेलिकॉप्टर अपघात; सात ठार, चिमुरडीसह महाराष्ट्रातील जयसवाल कुटुंबाचाही समावेश

रुद्रप्रयाग/उत्तराखंड – केदारनाथच्या मार्गावरील गौरीकुंड परिसरात रविवारी पहाटे भीषण हेलिकॉप्टर अपघात झाला. श्री केदारनाथ धामहून गुप्तकाशीच्या दिशेने जात असलेले हेलिकॉप्टर सकाळी ५.३० च्या सुमारास अपघातग्रस्त झाले. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण सात जण प्रवास करत होते. दुर्दैवाने सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये २३ महिन्यांच्या एका चिमुरडीचाही समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच NDRF आणि SDRF च्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत हेलिकॉप्टर सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

हेलिकॉप्टर कोसळण्यामागे खराब हवामान कारणीभूत

मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन एव्हिएशन कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते आणि खराब हवामानामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गौरीकुंडच्या वरील भागात घास कापत असलेल्या नेपाळी महिलांनी हा अपघात प्रत्यक्ष पाहिला आणि प्रशासनाला माहिती दिली. हेलिकॉप्टर नोडल अधिकारी राहुल चौबे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह रजवार यांनी अपघाताची अधिकृत पुष्टी केली आहे.

मृतांमध्ये महाराष्ट्रातील जयसवाल कुटुंब

या अपघातात महाराष्ट्रातील वाणी (नंदेपेरा रोड, साई मंदिर) येथील जयसवाल कुटुंबातील राजकुमार जयसवाल (४१), शारदा जयसवाल (३५) आणि त्यांची २३ महिन्यांची चिमुरडी काशी यांचा समावेश आहे. याशिवाय विनोद नेगी, विक्रम सिंह रावत (BKTसीचे कर्मचारी), तुस्ती सिंह (१९) आणि कॅप्टन राजीव (राजस्थान) यांचा देखील मृतांमध्ये समावेश आहे.

मृतांची संपूर्ण यादी:

  1. विक्रम सिंह रावत (४६) – रांसी गाव, उखीमठ तालुका, रुद्रप्रयाग जिल्हा

  2. विनोद देवी (६६) – सिव्हिल लाईन २, बिजनौर, उत्तर प्रदेश

  3. तुस्ती सिंह (१९) – बिजनौर, उत्तर प्रदेश

  4. राजकुमार जयसवाल (४१) – वाणी, महाराष्ट्र

  5. शारदा जयसवाल (३५) – वाणी, महाराष्ट्र

  6. काशी (२३ महिने) – वाणी, महाराष्ट्र

  7. कॅप्टन राजीव – राजस्थान (आर्यन एव्हिएशन)

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी व्यक्त केला शोक

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत म्हटले की, “रुद्रप्रयाग जिल्ह्यात घडलेली ही दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. SDRF, स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी मदत कार्यात गुंतले आहेत. बाबा केदारकडे सर्व यात्रेकरूंच्या कुशलतेसाठी प्रार्थना करतो.”

सीएम धामी यांनी यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत व्हर्च्युअल आपत्कालीन बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पुढील २ दिवसांसाठी हेलीकॉप्टर सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker